Wednesday, 30 December 2015 0 comments

नव्या वर्षात जाताना...

२०१५ माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय वर्ष...

खूप काही दिलं या नवीन वर्षाने   नवीन मित्र,नाती अनुभव,यश-अपयश आणि जिद्दीने जगण्याची प्रेरणाही.

गतवर्षात अपेक्षेइतका पैसा नाही कमावता आला कदाचित पण तुमच्यासारखी जी जिवलग व गोड माणसे मिळाली हि करोडो रुपयांना ही लाजवणारी होती.

गतवर्षात माझ्या सुख- दुखात,आनंदात आपला प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे  सहभाग हा नक्कीच सुखावणारा होता. त्याचप्रमणे गतवर्षात मिळालेल्या माझ्या लेखनरुपी  यशाला आपल्या कौतुकाची जी सोनेरी किनार मिळाली हीच माझी प्रेरणा ठरली.

आपले सर्वांचे प्रेम,आधार आणि प्रेरणा येत्या नवीन वर्षातही अशीच राहो तसेच आपली नाती वर्षानुवर्षे अशीच दृढ होत जावो हीच गणेशाचरणी प्रार्थना.

तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे नवीन वर्षासाठी व येणाऱ्या नवीन यशासाठी खूप खूप शुभेच्छा 

आपलाच 

सागर नवनाथ ननावरे  

0 comments

                                                    मावळतीच्या सूर्याप्रमाणे
                                                       सरले आणखी एक वर्ष
                                                         सज्ज झाल्या दाही दिशा
                                                              करण्या नववर्षाला स्पर्श 
Tuesday, 29 December 2015 0 comments
                                                           साहित्यातील ध्रुवतारा निखळला


                                              "या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे"
या ओळींनी अखंड मानवजातीला जगण्याचा खरा अर्थ मिळवून दिला पण आज कविवर्य मंगेशकरांच्या जाण्याने या ओळीही पोरक्या झाल्या. कधी निमुटपणे अन्याय सहन करणाऱ्या समाजाच्या षंढ पानावर आपल्या काव्यातून ताशेरे ओढणारे पाडगावकर तर कधी जगण्यातला दुर्दम्य आशावाद जागविणारे कवी पाडगावकर खरं तर तमाम रसिकप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पाडगावकर हे एकमेवाद्वितीयच!
                                              निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही ! 
                                                आपल दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही !!
असं म्हणून स्वाभिमानी आणि स्वावलंबीपणा त्यांनी प्रत्येकाच्या नसानसात भरला. ' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच नि आमचं सेम असतं',अशा  शब्दांत सर्वांना प्रेम करण्यास शिकवणा-या पाडगावकरांच्या प्रेमात संपूर्ण महाराष्ट्र पडला होता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर आपल्या कविता मनमुराद उधळणारा आणि आपल्या कवितांतून सर्वांचं जीवन समृध्द करणारा  पाडगावकरांसारखा दुसरा कवी मराठीत नाही..
मराठीला आपल्या कवितांनी चिरतरूण करणाऱ्या कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. कण्हत कण्हत जगण्यापेक्षा गाणे म्हणत जगायला शिकविणारे पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण  पाडगावकर जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या कविता मात्र अजरामर राहतील.
कविवर्य पाडगावकरांना विनम्र श्रद्धांजली.

- सागर नवनाथ ननावरे
Ref by:sagarnanaware.blogspot.in
Friday, 11 December 2015 0 comments
                    " स्मार्टफोन वरचा 'सेल्फि'शपणा "
                                                 -सागर नवनाथ ननावरे (12/12/15)

असं म्हणतात टेक्नॉलॉजीमुळे जग जवळ आलंय,जगाचे माहित नाही पण स्मार्टफोन मात्र सर्वांच्या जवळ आले आहेत. स्मार्टफोन ही प्रत्येकाची त्यातल्या त्यात तरुणाईची  मुलभूत गरज होऊन बसली आहे. पूर्वी स्वतःसाठी,कुटुंबासाठी झटणारे आता " फोन के लिये साला कुछ भी करेगा' अशा अविर्भावात वागत आहेत. सध्याच्या युगात कामाचा व्याप व वेग पाहता आपण नवनवीन  टेक्नॉलॉजी व बदल  नाकारु शकत नाही ! स्मार्ट फोनचा योग्य वापर योग्य वेळी करुन आपण ई-मेल,सोशल मिडीया,गुगल सर्च व स्मार्ट फोनचा उपयोग कॉम्प्युटर किंवा कामात मदतनीस म्हणुन केल्यास ते एक अत्याधुनिक वरदानच म्हणता येईल.
दुर्दैव इतकंच स्मार्टफोन जवळ येऊनही माणूस अजूनही 'स्मार्ट'' झालेला नाही, कारण कोनती गोष्ट कशासाठी,कितीवेळ आणि कशाप्रकारे वापरावी हे अजून कुणाला समजलेच नाही.
काही दिवसांपूर्वीच व्होट्सअपवर  वाचनात आलं आणि मन अस्वस्थ झालं ,रेल्वेप्रवासात दाराला लटकून प्रवास करताना एकाला आपला जीव गमवावा लागला. पण यापेक्षाही पुढची हद्द म्हणजे त्याला हात देण्याऐवजी,आधार देण्याऐवजी आजची 'सेल्फी'श' तरुणाई त्याच्या जीवासाठी चालणाऱ्या धडपडीचे मोबाईल वर शुटींग करत होती. हीच का ती टेक्नॉलॉजी माणसाच्या जीवावर बेतणारी, माणसाला माणुसकीपासून दूर नेणारी?
आजकाल अशा बर्याच घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि त्या याच टेक्नॉलॉजीमुळे आपणापर्यंत पोहोचतातही पण प्रश्न एवढाच पडतो कि एखाद्याच्या मदतीसाठी धावण्याऐवजी त्याच्या मोबाईल शुटींगसाठी लोकं एवढे का धावतात?
हीच वेळ जर आपल्या कोणावर आली आणि त्यावेळीही असाच अनुभव आल्यावरच आपण शहाणे होणार का?
ज्या शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी,गोरगरिबांच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली आणि स्वराज्याची स्थापना केली त्या शिवबाच्या भूमीतील त्याचे वारसदार हाती स्मार्टफोन घेऊन विकृतीला आळा घालण्याऐवजी त्याचे चित्रण करतात हाच का आपला वारसा?
आपल्या आया बहिणींवर हात टाकणाऱ्यांचे हात छाटण्याची शिकवण ज्या शिवबाने दिली त्याच्याच भूमीत स्त्रियांवर अत्याचार करून तेच हात स्मार्टफोनने अश्लील चित्रण करतात हीच का आमची संस्कृती?
आजकाल प्रत्येकजण आपल्या सेल्फी'त इतका गुंतलाय कि त्या वरवरच्या सुंदर दिसणाऱ्या सेल्फिने आपलं अंतर्मन मात्र पूर्ण पोखरून टाकलंय. माणुसकी,आपुलकी,परोपकार आणि प्रेमाची जागा आज स्मार्टफोनच्या 'सेल्फि'शपणाने केव्हाच आपल्या मेमरीतून डिलीट केलीय. लोकांच्या हृदयात राहण्याऐवजी मोबाईलवर ऑनलाईन राहण्यातच जो तो मश्गुल आहे.
आपल्या शरीरावर प्रेम करणारी,व्यायाम करून शरीराच्या अब्स साठी धडपडणारी तरुणाई आज मोबाईल मधल्या अप्स साठी धडपडतेय कसे राहणार हे फिट. मैदानी खेळांनी चपळ आणि सशक्त असणारी तरुणाई आज तरुणाई चष्मा लागेपर्यंत आणि डोक्याचे सपाट मैदान होईपर्यंत स्मार्टफोन वर गेम्स खेळतात हेच का आमच्या  देशाचे भवितव्य?
व्होट्स अप वर डीपी ठेऊन थोरांना मानवंदना देण्यात कसला आलाय देशाभिमान?
निषेद किंवा समर्थनाच्या पोस्ट शेअर करून स्वतःच्या पुचकट योगदानाची साक्ष देण्यात कसली आलीय मर्दुमकी?
आणि फोटो एडीट करून चमकवून  फेसबुक वर टाकून स्वतःच्या दोषांवर पांघरून घालण्यात कसले शहाणपण?

मित्रांनो बदल आणि टेक्नॉलजी नक्कीच मानवाच्या जीवनात बदल घडवू शकते पण हीच टेक्नॉलजी आपल्याला चुकीच्या सवयीचे गुलाम सुद्धा बनवू शकते.
अजूनही वेळ गेली नाही आपल्या आयुष्यात आपल्याला शेवटपर्यंत साथ देणाऱ्या माणसांना स्मार्टफोनच्या 'सेल्फि'शपणामुळे दुरावण्यात काहीही अर्थ नाही. कारण आयुष्य खूप सुंदर असलं तरी ते एकदाच मिळतं हे विसरून चालणार नाही. त्यामुळे या एकदाच मिळालेल्या सुंदर आयुष्यात वेळ,पैसा आणि बुद्धी स्मार्टफोनच्या अतिव्यस्त मायाजाळात वाया घालवून हाती काहीही लागणार नाही. शेवटी कुठे थांबायचे आणि काय करायचे ते आपण आपलेच ठरवायचे आहे.


लेखन आणि संकल्पना: सागर नवनाथ ननावरे
पत्ता: बालाजीनगर,धनकवडी,पुणे

Blog: sagarnanaware.blogspot.in






Thursday, 10 December 2015 0 comments
‘मनाचा कॅमेरा’
लग्नानंतर हनिमून साठी कुठे जायचे यावर विचारमंथन चालू असताना मनात अनेक पर्यटन स्थळांची नावे येउन गेली पण शिक्कामोर्तब ाही होईनाअखेरीसजीवाचा "गोवा "करायचे ठरविले आणि गोव्याला जाण्यासाठी निघालोपुण्यावरून रात्री बसलो असता सकाळी गोव्यात ोहोचलोभूरळ घालणारे समुद्रकिनारे निसर्गरम्य ठिकाणी सामूहि सहल करण्यापेक्षा स्वतः जोडीने वेगवेगळी ठिकाणे गाडीने जाऊन फिरण्याची मजा काही औरच होतीकलंगुट वर मनसोक्त पाण्यातभिजल्यानंतर जवळच - किमी अंतरावर सणाऱ्या प्रसिध्द बागा बीच पाहण्यासाठी बीचच्या किनाऱ्यावरून जाताना पायाला मखमली स्पर्श देणारी वाळू मनालाआनंद देत होतीसमुद्राच्या उंच दुधाळ लाटा,किनाऱ्यावरची नारळीची झाडेभणाणणारा खारा वारा आणि या निसर्गसागराचा आनंद लुटणारे देशी
 विदेशी पर्यटक अशीनयनरम्य दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत चाललो होतोया साऱ्या आठवणी टिपणारा आमचा कॅमेरा म्हणजे जणू ाही सच्चा सवंगडीच वाटत होता.
बागा बीच थोड्याच अंतरावर आलेला असतानाच जोरदार पावसाने त्या ौंदर्यावर एक मनमोहक साज चढवला. आम्ही दोघे पूर्ण पावसात भिजलो होतो दोघांचेमोबाईल प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होतेअचानक फोन वाजू लागला म्हणून मी मोबाईल बाहेर काढून पहिला तर वडिलांचा मिस कॉल दिसला परंतु गोव्याच्या यासौंदर्याचा आस्वाद घेण्यात मग्न असल्याने नंतर कॉल करत येईल म्हणून  मी दुर्लक्ष केले  फोन तसाच खिशात ठेवलावरू कोसळणारा जोराचा पाऊस आणिपोटापर्यंत येणाऱ्या समुद्राच्या लाटा या आनंदात पूर्ण न्हावून निघालो होतोतासभर आनंदाचा आस्वा घेतल्यानंतर अंधाराची चाहूल ागताच आम्ही बाहेर पडलोआणि रूमकडे जाण्यासाठी निघालोपाऊस ांबलेला होता म्हणून घरी फोन करण्यासाठी मोबाईल काढला दोघांचे मोबाईल बंद होते.
कदाचित भिजल्यामुळे बंद पडले असतील म्हणून रूम वे गेल्यावर सीमकार्ड  काढून पंख्याखाली वळायला ठेवून पहिला पण काही केल्या फोन चालू होत नव्हते.त्यानंतर मोबाईल स्टोअर मध्ये दाखवले परंतु ते डेड झाले असल्याचे कळाले आणि सर आनंदच क्षणात निवळला.  
 सकाळी पोहचल्यानंतर परत कॉल का नाही आला या काळजीपोटी घरचे काळजीत असणार याची चिंता सतावत होतीआता कॅमेऱ्यात टिपलेले अविस्मरणीय क्षणपरत कसे पाहता येणापहिल्याच दिवशी अशी अवस्था ाल्याने पुढील दिवसांची क्षणचित्रे कशी काढता येणार ? आणि आता संपूर्ण टूर एकदम निरस होणार या विचारांनी मन कासावीस झाले. पाहता पाहता ते २/३ दिवस अगदी धमाल मौज मजेत निघूनही गेले. पुण्याला येताना गाडीत एकूणच टूर बाबत मनात विचार येऊ लागले. आणि या गोव्याच्या भेटीत काय गमावले  आणि काय कमावले याची वेगवान चक्रे मनात फिरू लागली. मोबाईल आणि त्या क्षणांच्या आठवणींना या टूर मध्ये मुकलो होतो पण मोबाईल मुक्त टूर चा आनंद विनाव्यत्यय घेतला होता.
कॅमेऱ्यात फोटो टिपण्याच्या नादात तो निसर्ग मनामध्ये साठवायला विसरलो नव्हतोनिसर्गाचे  चित्तवेधक आणि अद्भुत रूप मनाच्या कॅमेऱ्यात भरभरून साठवलेहोतेना कॉल ना मेसेज ना व्होट्स अप फक्त आणि फक्त भटकंतीचा आनं .
बऱ्याचदा आपण  कॅमेऱ्यात क्षण  टिपण्याचा प्रयत्न करतो आणि एखाद्या सुंदर कलाकृतीचा,स्थळाचा थवा अविस्मरणीय क्षणाला आपल्या मनात साठवायलाविसरतोएकूणच या गोवा ट्रीपने  मला हे चांगलं कळलं कि कॅमेऱ्याने आपण  ते सारे क्षण फोटो पाहून आठवू शकतो पण पल्या मनाच्या कॅमेऱ्यात मात्र ते साठवूशकत नाहीपाहिले दोन िवस मोबाईलविना घालवताना नशीबच फुटकं सारखे  ‘फुटकळ’ विचार मना आले पण नंतर मात्र एका उक्तीचा चांगलाच साक्षात्कार झालाआणि तो म्हणजे " जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं".
Friday, 4 December 2015 0 comments

Awarded by



0 comments

dostanchi duniyadari in Maharashtra Times


Tuesday, 24 November 2015 0 comments

यांना शहाणपण देगा देवा...

            यांना शहाणपण देगा देवा...

कोण तो म्हणे अमीर खान म्हणतोय की माझ्या पत्नीला या देशात राहण्याची भीती वाटते
काही दिवसांपूर्वी असाच ज्याला या भारताने किंग बनवला तो शाहरुख खान सुध्दा असंच काही बरळला  होता. अरे काय चालवल आहे यांनी उगाचंच उचलली जीभ लावली टाळ्याला.
यांना हे माहीत नाही की जर सुपरस्टार म्हणून  देश जर यांना किंग बनवू शकतो त्याचप्रमाणे देशाच्या अस्मितेशी खेळ करण्याचा प्रयत्न केल्यास शिंग ही दाखवू शकते.
           लाज वाटायला पहिजे या सेलिब्रिटिना अशी वक्तव्य करताना. एकीकडे देशासाठी बलिदान देणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी आपलं कुंकू देशासाठी पणाला लावते आणि___ आपल्या मुलांनाही देशसेवेस पाठविण्याचे जगजाहीर आश्वासन देते. तर दुसरीकडे पैसा,वलय,प्रसिध्दीचा माज असणाऱ्या आणि रात्रीच्या पार्टीत नंगानाच करण्यास आपली संस्कृती मानणारे सेलीब्रटी अचानक स्वतःला असुरक्षित का समजू लागले? कारण हे अभिनेते आता स्वतःतील अभिनय विसरून स्वतःला नेते समजू लागले आहेत. पण यांना हे समजत नाही की सर्कशीत काम करणारे जोकर फक्त मनोरंजनासाठी, विनोदासाठी  लोक पसंत करतात पण  आपल्या धडाडीने वाघाला काबूत ठेवणाऱ्या रिंग मास्टरला मात्र लोक टाळ्यांनी दाद देतात. त्यामुळे अमीर,शाहरुख सारख्या जोकरांनी उगीचच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन समाजात दुही पाडण्याचा निरर्थक प्रयत्न करू नये.
ज्या अमीर खानला लोकांनी 'राजा हिंदुस्तानी' बनवला तो अमीर खान 'सरफरोश' मधला देशभक्त होण्याऐवजी 'फना' मधला देशद्रोही का बनू पाहतोय हे कळत नाही. याने मनात प्रश्न निर्माण होतो की 'सत्यमेव जयते ' तून केलेला  देशातील जागर आणि "अतुल्य भारत " ची हाक हा बहुधा आर्थिक पूर्तिसाठी केलेला अभिनय होता.
म्हणे असहिष्णुता, असुरक्षितता वाटते,...
अचानक  या साऱ्या लोकांच्या अंगातअसहिष्णुतेच भूत का  आलं?
1993 चा बॉम्बस्फोट, 26/11 चा हल्ला यांत शेकडो निरपराध मारले गेले तेव्हा कुठे गेली होती त्यांची सहिष्णुता?
ज्या देशात तीन 'खान' सुपरस्टार आहेत तिथे कसली आलीय असहिष्णुता ?

अरे अभिमान आहे आम्हांला आमच्या देशाचा आणि इथल्या एकतेचा. आजही इथे हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन सारे संकटात एकमेकांच्या खांद्याला खांदे लावून उभे राहतात आणि यापुढेही राहणार.

सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा

लेखन : सागर ननावरे
संकलन: sagarnanaware.blogspot.in

शेअर करावा वाटल्यास नक्की करा. आपला एक मेसेज नक्कीच सर्वांना एकीला प्रेरणा देऊ शकतो

Friday, 20 November 2015 0 comments

                                                                     एक पत्र देशासाठी...
कर्नल संतोष  महाडिक,.............
प्रथमत आपणाला आणि आपल्या शौर्याला माझा सलाम.
आपल्या शौर्याची दाद प्रत्यक्षात भेटून देता येणार नाही हे आमचे दुर्भाग्य. म्हणूनच एक पत्र लिहितोय जे कदाचित आपणापर्यंत पोहोचणारही नाही, तरीही लिहितोय.
कर्नलजी आपल्या असामान्य जिद्दिबद्दल आपले आभार मानायचे होते.
आमच्या सारखी सामान्य माणसं एवढं तरी नक्कीच करू शकतात .एकिकडे दिवाळीचा जल्लोष तर  दुसरीकडे असहिष्णुता, निवडणुका,तुरडाळ,स्मारक यांच्या वादात आम्ही इतके तल्लीन होतो कि आम्हाला याचा विसरच पडला हो कि,तुम्हाला पण दिवाळी असेलच ना? तुमचीही दोन पिल्लं आतुरतेने वाट पाहत असतीलच ना? पण नाही राष्ट्रभक्ती आणि जबाबदारीच्या मनगटाने हातात देशाच्या रक्षणासाठी बंदूकरुपी कंदील घेतले. कदाचित आम्ही नावाने आणि शरीराने जरी मोठे झालो असलो तरी आमची वैचारिक वाढ नक्कीच खुंटलीय. कोणाला काहीच फरक पड़त नाही. आमचं रुटीन  ऑफिस, आमचा व्यवसाय, आमच्या राजकीय कुरघोड्या आणि  चिखलफेक, आमची जातीय समीकरण, आमच्या ओल्या-सुक्या पार्ट्या या काही थांबणार नाहीत. एवढंच काय, आमच्या वॉटसच्या या अतिव्यस्त जीवनात  दोन मिनिट थांबुन तुमच्यासाठी दोन अश्रुंची श्रद्धांजली दयायलाही वेळ मिळेल कि नाही याची शंकाच आहे. पण  फरक पडेल तुमच्या घरच्यांना, ज्यांनी काळजावर  दगड ठेऊन तुम्हाला देशासाठी...आमच्यासाठी... सरहद्दीवर जाऊ दिलं. फरक पडेल तुमच्या अर्धांगिनीला, तुमची सर्वांत जास्त आठवण येईल त्या दोन निरागस पिल्लांना. बाकी सर्व आपल्या आपल्या खुज्या आणि फाटक्या दुनियेत मश्गुल राहतील. हे सर्व सत्य आपल्याला माहीत असताना देखील आपण आमच्यासाठी प्राणाहुती दिलीत.
सलाम तुमच्या त्यागाला,जिद्दीला,राष्ट्रभक्तीला आणि  सलाम तुमच्या माता-पित्यांना ज्यांनी असा पुत्र घडविला, सलाम तुमच्या सारख्या तमाम जवानांना.
शहीद कर्नल महाडिक अमर रहे...!

लेखन आणि संकल्पना  : सागर ननावरे
संकलन: sagarnanaware.blogspot.in

0 comments
         
प्रसिद्धीसाठी धर्म कि धर्मासाठी प्रसिद्धी
शाहरुख खानच्या विधानानंतर देशात जी काही शाब्दिक चिखलफेक चाललीय ती भारतासारख्या धर्मनिरपेक्षदेशासाठी अजिबात योग्य नाहीदेशात विविध जातीधर्माचे करोडो सर्वसामान्य लोक एकरूप होऊन आणिगुण्यागोविंदाने नांदत आहेतहे सर्वजण माणुसकी हा धर्म आणि एकता हीच जात मानून धर्मनिरपेक्षतेचे एकआगळे वेगळे उदाहरण जगासमोर ठेवत आहेतपरंतु प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी हपापलेले हे दिग्गजनेतेआणि अभिनेते देशात धार्मिक अराजक माजविण्याचा प्रयत्न करत आहेतयांच्यामुळे भारतासमोर झुकल्या मानेनेराहणारे पाकिस्तान सारखे देशही देशातील अंतर्गत वादात तोंड खुपसत आहेतशाहरुखनेही अशी वक्तव्ये करून वादनिर्माण करण्यापेक्षा हे लक्षात ठेवायला हवे कि जे लोक प्रेमाने त्याला किंग बनवू शकतात ते त्याला शिंगावरघ्यायलाही कमी करणार नाहीतधर्मासारख्या भावनिक मुद्द्यांवर राजकारण करून आपल्या देशाचे आणिसमाजाचे खूप मोठे नुकसान   हे लोक करीत आहेतआता सर्वसामान्यांनी या अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याआणि बाष्कळ बडबड करणाऱ्या लोकांकडे लक्ष  देता आपल्या एकतेची आणि बंधुभावाची ज्योत अशीच तेवत ठेवून आपला धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा आदर्श जगासमोर ठेवावा.

Tuesday, 27 October 2015 0 comments
स्मार्ट पुण्याच्या निर्मितीत स्मार्ट नागरिक म्हणून माझी भूमिका
                                                                                                                 - सागर नवनाथ ननावरे

                          "कितीही फिरू द्या दुनिया सारी
आमच्या पुण्याची गोष्टच न्यारी "
खरं तर 'पुणे तिथे काय उणे',विद्येचे माहेरघर, 'सांस्कृतिक शहर'असे पुण्याची ओळख सांगणारे शब्द ऐकले कि उर कसा अभिमानाने फुलून येतो. मनात आपण पुण्यासारख्या मराठमोळ्या शहराचा नागरिक असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. काही दिवसांपूर्वी शासनाने नियोजित स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पुण्याची निवड केली काय आणि माझ्यातला  'स्मार्ट नागरिक' आपोआपच जागा झाला. एक कर्तव्यदक्ष आणि सजग नागरिक म्हणून माझं अंतर्मन मला क्षणोक्षणी, जागोजागी कृतीद्वारे मिरवायला लागलं. माझ्या पुण्याच्या स्मार्टनेस साठी एक स्मार्ट नागरिक म्हणून माझी भूमिका काय असावी याची चक्रे डोक्यात वेगाने फिरू लागली. माझी स्वप्ने हि स्मार्ट पुण्यासाठी स्मार्ट झाली.मनात मी माझ्या भावी स्मार्ट पुण्याच्या कल्पनांना उजाळा द्यायला लागलो.
माझ्याप्रमाणेच माझ्या मित्रपरिवाराचीही काहीशी अवस्था झाली होती आणि पुण्यातल्या पुण्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांचीही तीच अवस्था असणार याची पूर्ण खात्री होती.
 म्हणून स्मार्ट पुण्यासाठी स्मार्ट आणि कर्तव्यदक्ष नागरिकांची एक मोठी संघटना उभी करण्याचा मी प्रथम प्रयत्न करेल. कारण या संघटनेच्या माध्यमातून एक चळवळ उभी राहील आणि लोकसहभागानेच स्मार्ट पुण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. अशा लोकांच्या एकीसाठी मी सोशल मिडिया, जनजागृती,प्रबोधनपर तसेच मनोरंजनाच्या साधनांमार्फत प्रयत्न करेल आणि एक स्मार्ट नागरिक म्हणून संघटनेच्या आणि लोकसहभागाच्या माध्यमातून कार्यास प्रारंभ करेल.
मी पुण्याचा स्मार्ट नागरिक अन  पुणे माझी शान
स्वतःपासून करुनी सुरुवात जागवू पुणेरी स्वाभिमान






स्मार्ट पुण्यासाठी मी माझ्या कल्पक  मनाने आखलेल्या 'स्मार्ट पंचतंत्र' अंमलात आणेन. आणि ती पंचतंत्री किंवा पंचसूत्री  म्हणजेच…
1) सुरक्षित पुणे ( सुरक्षित)
२) हरित पुणे- संमृद्ध पुणे  (पर्यावरण पोषक)
३) ऐतिहासिक-सांस्कृतिक पुणे
४) डिजिटल पुणे ( आधुनिक व तंत्रज्ञानयुक्त )
५) सुंदर पुणे ( स्व्च्छ, शिस्तप्रिय व नीटनेटके )
गेली अनेक दशके सुरक्षित शहर म्हणून प्रसिध्द असणार्या पुण्याला बॉम्बस्फोट,चोरी, गुन्हेगारी,दहशत आणि दुर्घटना यांनी ग्रहण लावले आहे. म्हणूनच आपल्या शहरात महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी  सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत यासाठी आम्ही आग्रही असू. तसेच याव्यतिरिक्त आपल्या परिसराच्या किंवा सोसायटीच्या सुरक्षिततेसाठी संबधित सोसायट्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी जनजागृतीही करू. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीसाठी काही टक्के रक्कम शासनाकडूनही मंजूर करून आणण्यासाठी पाठपुरावा करता येईल. त्याचप्रमाणे गुन्हेगारांचे धाबे दणाणावेत यासाठी Fight Against Crime नामक सुजान नागरिकांची व सुशिक्षित तरुणांची एक शासनमान्य संघटना कार्यरत करता येईल. तसेच या संघटनेच्या माध्यमातून गुन्हेगारी क्षेत्रात प्रबोधनात्मक उपाय करण्यासाठी प्रबोधन संस्थांचाही यात सहभाग करून घेऊ. त्यामुळे माझ्या शहरातील सर्व नागरिक भयमुक्त संचार करू शकतील . पर्यटकांनाही पुण्यात एक कमालीची सुरक्षितता जाणवेल त्यातून आर्थिक व औद्योगिक उलाढालींना चालना मिळेल. थोडक्यात स्मार्ट सिटी अगोदर पुणे हि सेफ सिटी व्हावी यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेल.
सुरक्षिततेनंतर माझी सिटी हि समृद्ध म्हणजेच हरित असावी यासाठी मी आग्रही असेल. वृक्षतोड पूर्णपणे बंद व्हावी यासाठी वृक्षांचेही वर्गीकरण करून त्यास एक ठराविक मुल्य देता येईल व वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई म्हणून तेवढी रक्कम व दंडही करण्यात यावा अशी उपाययोजना करता येईल.


शहरात वाढदिवशी फ्लेक्स लावून शहर खराब  करण्यापेक्षा " वाढदिवस हा झाडदिवस " हि संकल्पना राबवता येईल. प्रत्येक वाढदिवसाला आठवण म्हणून एकतरी झाड लावायचे आणि त्याचे संवर्धन नियमितपणे करायचे अशाप्रकारची हि संकल्पना असेल. यात शहरातील डोंगर,ओसाड जागा, गड किल्ले, बगीचे आणि रस्त्यांच्या दुतर्फा असणार्या पडीक जागेचाही विनियोग करू. त्याचप्रमाणे देवाज्ञेने आपल्याला सोडून जाणाऱ्याअप्तेष्टांसाठी व आपल्यांसाठी त्यांची आठवण म्हणून एक तरी झाड लावायचे आणि त्या जणू व्यक्तीची काळजी घेतो त्याप्रमाणे त्या झाडाचीही काळजी घेत येईल. हि संकल्पना जनमानसात " स्मृतीवन एक पुनरुज्जीवन " हि संकल्पना त्या व्यक्तीच्या स्मृती त्या झाडाच्या रूपाने जणू पुनर्जीवित झाल्याची साक्ष देतील. त्यामुळे शहराला मोठा ऑक्सिजनचा साठ उपलब्ध होईल व लोकांचे आरोग्यही निरोगी राहील. वृक्षांची मोठ्या प्रमाणात होणारी लागवड नक्कीच प्रदूषणाला आळा घालेल. स्मार्ट शहरात प्रदूषण व वाहतुकीच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणजे सायकलचा अधिकाधिक वापर. सायकल वापरासाठी लोकांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी ' सगळ्यात भारी
                                             सायकल सवारी '
अशी महीम सुरु करता येईल व विविध क्षेत्रातील सेलेब्रिटींच्या सहकार्याने हि मोहीम अधिक प्रभावी करता येईल. ध्वनी,जल आणि वायू प्रदूषणावर कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली काम करता येईल.
यानंतर पंचसुत्रीतील तिसरा आणि पुण्याच्या नावलौकिकात मनाचा तुरा रोवणारा घटक म्हणजेच सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे जतन व विकास. छत्रपती शिवराय,संत महंत,स्वातंत्र्यसेनानी यांच्या धगधगत्या समर्पणाची साक्ष देणार्या पुण्याला एक ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर म्हणून जगभरात मिरविण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील. शनिवारवाडा,लालमहाल,सिंहगड व इतर प्रेक्षणीय स्थळे,बगीचे, संग्रहालये,शतकपुर्तीकडे वाटचाल करणार्या संस्था, कॉलेजेस अशा प्रत्येक वस्तूचे जतन करण्यासाठी " दिमाखदार पुणे आमचा अभिमान " या नवे एक जनचळवळ सुरु करू.



"संस्कृतीच्या वारशाची
              साक्ष देतात गडकिल्ले       
मौजमजेच्या नावावर नको
वास्तूंवर हल्ले"
म्हणूनच संस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता,त्यांचे जतन व त्यांच्या संवर्धनासाठी' पुण्यात इतिहासप्रेमी मित्रमंडळ' ची स्थापना कार्यात येईल. त्याचप्रमाणे या कार्यात तरुणाईचा व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा यासाठी शाळा व कॉलेजेसमध्ये प्रत्येक सहा महिन्यांतून एकदा वास्तू संवर्धनासाठी एक दिवसभर आपले कार्यरूपी योगदान देता यावे यासाठी कार्यशिक्षण  किंवा अनैच्छिक ( सक्तीच्या ) प्रात्यक्षिकाचा समावेश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
यानंतर आजच्या आधुनिक जगात आपली आधुनिकता सिध्द करण्यासाठीचे चौथे तंत्र म्हणजेच "डिजिटल पुणे".
डिजिटल पुणे हा पुण्याच्या विकासरथाचा गाभा ठरणारा घटक असणार आहे त्यामुळे सरकारी कामात लोकसहभाग वाढवण्यासाठीतसेच ते काम अधिक पारदर्शी बनवण्यासाठी ते अधिक लोकाभिमुख करण्यासाठी डिजिटल पुणे संकल्पना महत्वपूर्ण ठरणार आहेयामाध्यमातून आयटी क्षेत्रातील मुरब्बी लोकांच्या सहाय्याने -एज्युकेशन-हेल्थ-साईन,नागरी इंटरनेट-गव्हर्नन्सडिजिटललॉकरची व्यवस्थापेपरलेस कार्यालये आणि एकूणच जागतिक दर्जाचे डिजिटल तंत्रज्ञान अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करूया संपूर्ण डीजीटलायझेशन संकल्पनेमुळे नागरिकांची शक्ती वेळ आणि पैशाची बचत तर होईलच परंतु सर्व कारभार पारदर्शक होऊन भ्रष्टाचारालाआळाही बसेल.  डिजिटल पुण्यासाठी खास ॅप्स तयार करुनत्यात डिजिटल पुणे  पोर्टलमायगोव्ह मोबाईल ॅपचर्चा कृतीआणि वापर या तत्त्वांवर आधारित मोबाईल सेवा ॅपच्या माध्यमातून पुणेकरांना देउम्हणूनच मला एक सजग नागरिक म्हणूनलोकसहभागाच्या जोरावर डिजिटल पुणे या संकल्पनेच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानावर आधारित ताकदवान अर्थसत्ता म्हणूनपुण्याला नावलौकिक मिळवून द्यायचा आहे.





माझ्या दृष्टीने शेवटचे आणि महत्वाचे तंत्र म्हणजे सुंदर पुणे. यामध्ये केवळ पुणे शहर रंगरंगोटीने सुंदर नाही तर बेशिस्तपण,वाहतूक समस्या,अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण,फ्लेक्सबाजी,कचरा समस्या इ. गोष्टींवर उपाययोजना हि स्मार्त सिटीसाठी अत्यंत आवश्यक आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त नाही,नियमांचे पालन होताना दिसत नाहीवारंवार ट्रॅफिक जामहोत आहे त्यामुळे केवळ पूल बांधूनरस्ते दुरुस्तीने प्रश्न सुटणार नाहीततर प्रत्येकाने नियमाचे पालन केले तरच वाहतुकीची कोंडीफुटेलयासाठी शिस्तीचे पालन  करणार्यांच्या गाड्या काही दिवसांसाठी जप्त करण्याची कारवाई सुरु करावी तसेच वारंवारबेशिस्तपणा करणार्यांसाठी लायसन्स जप्तीचे उपाय योजता येतीलफुटपाथवर फेरीवाले  व्यावसायिकांचे अतिक्रमण रोखले पाहिजेतसे केल्यास डायरेक्ट कैद करण्यासारखी उपाययोजना असायला हवीगर्दीच्या रस्त्यांत ‘नो व्हेइकल झोन हवा,खासगी रिक्षाअवैधरिक्षाचालकांना एक मार्ग हवा,पादचार्यांसाठी भूमिगत रस्ते असावेत,पार्किंग योग्य जागी असावी तसेच डिव्हायडरची जागा कमी करूनरस्ता रुंदीकरण हवे या सर्वांमुळे शहरात सुटसुटीतपणा दिसून येईल आणि त्यादृष्टीने आम्ही पयत्न करू.
कचरा समस्येसारख्या महत्वाच्या समस्येसाठी टाकाऊ ते टिकाऊ ,घनकचरा प्रक्रिया पद्धती,शास्त्रीय जमीनभराव पद्धती,सेंद्रीय खतनिर्मिती तसेच पूर्ण ज्वलन पद्धती यांचा कचर्याच्या वर्गीकरणाप्रमाणे उपाययोजना करता येईल त्यासाठी महापालिकेच्या मदतीनेकचरा विल्हेवाट मोहीम फत्ते करू शकतोतसेच शहराला फ्लेक्सनी खराब करणार्यांच्या फोटोला त्वरित काढून संबंधीतांवर पोलिसांच्यामदतीने कारवाई करता येईल
खरं तर शहरासमोर इतरही अनेक समस्या आहेत आणि स्मार्ट सिटीसाठी विविध गोष्टींची अंमलबजावणीही करता येईल पण माझ्या मते या पंचसूत्रीचा जर पुण्यातील प्रत्येक नागरिकाने अंगीकार केला आणि स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट नागरिक म्हणून स्वतः पासून सुरुवात केली तर आपण आपली सिटी नक्कीच स्मार्ट बनवू शकतो.
 पुण्याच्या भविष्यासाठी
जबाबदारीने वागलं पाहिजे
स्मार्ट पुणे तर होणारच आहे
आता स्मार्ट म्हणून जगलं पाहिजे 

लेखन आणि संकल्पना :
सागर नवनाथ ननावरे
 
;