आज दसरा, हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा', याला आपण विजयादशमी असेही म्हणतो.
हिंदू संस्कृतीत या सणाला किंबहुना या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या दिवशी आखलेला बेत, केलेला शुभारंभ हा ध्येयप्राप्ती कडे नेणारा असतो अशी आख्यायिका आहे. भगवान श्रीरामाने याच दिवशी रावणाचा वध केला. याच दिवशी छत्रपती शिवरायांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवास प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे मोठे महत्व होते. पराक्रमी बाजीराव पेशवे याच दिवशी आगामी स्वारीचे बेत कायम करीत असत. अनेक शूर, पराक्रमी राजे, योद्धा याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. विजयादशमी म्हणजेच हमखास विजय मिळवून देणारा दिवस. आणि म्हणूनच या विजयादशमीला पूर्वापारपासून सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे.
सीमोल्लंघन म्हणजेच सीमा ओलांडून परीघाबाहेर जाऊन इप्सित साध्य करणे.सीमोल्लंघन म्हणजे 'असत' चा पराभव करून सत वर विजय मिळविणे.
सध्या आपण कोरोना सारख्या भयंकर विषाणूचा सामना करीत आहोत. या वर्षाच्या आरंभीच्या काही महिन्यात आपल्या जीवनात आलेल्या या राक्षसाने मानवी समस्त मानव जातीला संकटात टाकले.
आणि या अनपेक्षित संकटाने संपूर्ण जगाला हादरा बसला. आरोग्याबाबत काळजी वाढली, नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले आणि प्रचंड उदासीनता निर्माण झाली. लोकांच्या शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थावरही त्याचा परिणाम झाला आहे.
नकारात्मकता,न्यूनगंड, भीती, चिंता, तणाव आदि गोष्टींनी मानवी मनाचा अचानक ताबा घेतला. आजही कोरोनाचे भय कायम आहे किंबहुना निराशाजनक मानसिकता बऱ्यापैकी तशीच आहे. परंतु आपण जरी परिस्थिती बदलू शकत नसलो तरी मनस्थिती बदलणे हे मात्र आपल्या हाती आहे.
नवरात्रीने आपल्याला नवा उत्साह दिला आहे.आणि आज दसऱ्याच्या दिनी आपल्याला या नकारात्मकतेवर विजय मिळवून खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करायची आहे.
आजपासून निराशेवर मात करून आशा पल्लवित करणारी विजयादशमी. भूतकाळाच्या कटू अनुभवावर विजय मिळवून भविष्याच्या स्वप्नांना वाट मोकळी करून देणारी विजयादशमी.
नकारात्मकतेवर विजय मिळवून सकारात्मकतेकडे नेणारी विजयादशमी. बिघडलेल्या परिस्थितीवर विजय मिळवून उज्वल भविष्य घडविणारी विजयादशमी.
या विजयादशमीच्या निमित्ताने आपल्याला जीवनाच्या कुरुक्षेत्रावर आता सीमोल्लंघन करायचे आहे. भीती, नैराश्य, तणाव, न्यूनगंड, अपयश, बेकारी, चिंता,आळस,आरोग्याची काळजी आणि नकारात्मकता या मनातील दशमुखी रावणाचा वध करायचा आहे.
माझे खूप नुकसान झाले, तोटा झाला या गोष्टींना 'छोडो कल की बाते' म्हणत सोडून दिले पाहिजे. त्याचप्रमाणे आता पुढची काही वर्षे मंदीत जाणार मग माझे कसे काय होणार? ही भविष्याबाबतची अनावश्यक चिंताही आता मागे पडायला हवी. मी आज नव्या उमेदीने नव्या पर्वाची सुरुवात कशी करेल यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे.
प्रसिद्ध अमेरिकन कार्टूनिस्ट बिल किन ने म्हटले आहे की,
Yesterday is history, tomorrow is a mystery, today is a gift of God, which is why we call it the present.
कालचा दिवस भूतकाळ होता उद्याचा दिवस म्हणजे गूढ असेल परंतु आजचा दिवस हा देवाची देणगी आहे. याच सुविचाराला प्रमाण मानून आपल्याला कोरोनानंतरच्या किंबहुना कोरोनामधील जीवनात भविष्याचा वेध घेऊन वर्तमानाला जिंकायचे आहे. कोरोनाचे भय, लॉकडाऊन, तोटा, नुकसान आणि मनस्ताप या भूतकाळाचे विस्मरण व्हायला हवे.वपु काळे म्हणतात, "'क्षण' असा उच्चार करेपर्यंत तो क्षण जुना झालेला असतो.भूतकाळ बनलेला असतो.
तो क्षण गेला ह्याचं दु:ख करण्यात पुढचाही क्षण निघून जातो.
आयुष्य संपत जातं.
इच्छेला वेळ नसते...पण....
वेळ ही थांबणारी गोष्ट नव्हे.."
घडलेल्या गोष्टीतुन बोध घेऊन नव्या संधीचा शोध घेण्याची हिच योग्य वेळ आहे.आणि ज्या कोणाला हे उमजेल तोच उद्याच्या यशाची बीजे पेरू शकणार आहे.
या विजयादशमीच्या निमित्ताने आपल्याला पुढील दहा गोष्टींवर आता लक्ष केंद्रित करायचे आहे.
* भूतकाळातील प्रतिकूल परिस्थितीला अनुभव समजून नव्या ध्येयाचे बीजारोपण करा.
* परिस्थिती कशीही असो मनस्थिती कायम सकारात्मक ठेवा.
* अडचणींचा विचार करून निराश होण्यापेक्षा संधीचे सोने करून आशावादी व्हा
* आरोग्याबाबत नेहमीच जागरूक रहा.निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करा.
* संकटाने किती नुकसान केले यापेक्षा भविष्याबाबत काय धडे दिले याबाबत सकारात्मक संवाद साधा
* इतरांनाही तुमच्या बोलण्यातून प्रेरणा द्या. खचलेल्या मनांना आशेची उभारी देण्याचा प्रयत्न करा.
* या प्रतिकूल परिस्थितीचाही तुम्ही धैर्याने, इच्छाशक्तीने सामना करू शकलात याबद्दल स्वतःलाच शाबासकी द्या. देवाचे,कुटुंबियांचे,गुरुजनांचे आभार माना.
* कामात,वर्तनात,संवादात नावीन्यता आणा. नव्या संधींसाठी नव्या उत्साहाने सज्ज व्हा.
* ध्येयाची आखणी करा त्यातही दूरगामी ध्येयाबाबत आग्रही रहा.
* केवळ आजचा विचार न करता उद्या उदभवणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगासाठी सज्ज रहा.
यंदा आपल्याला सीमोल्लंघन करायचे आहे. आपल्या विचारांनी आणि आचरणाने आपले जीवन समृद्ध करायचे आहे. आणि यासाठी आजच्या दिवसाइतका प्रेरणादायी आणि फलदायी दिवस दुसरा नाही. चला तर मग कोरोनारुपी रावणाने दिलेल्या संकटांवर मात करून खरी विजयादशमी साजरी करूया.
विजयादशमीच्या शुभेच्छा.
लेखन : सागर ननावरे
Friday, 10 July 2020
#gocorona #matchagaistcorona
0
comments
स्वयंशिस्तीने जिंकूया, चला कोरोनाला हरवूया....
ही मॅच आपल्याला जिंकायची आहे....
कोरोना हा जीवघेणा व्हायरस आज आपल्यासमोर अनेक संकटे घेऊन उभा आहे...मात्र आपण खचून चालणार नाही.....
'स्वयंशिस्तीचा षटकार आता कोरोनाला हरवणार'
स्वयंशिस्तीच्या षटकारातील 6 गोष्टी आपल्याला काटेकोर पाळायच्या आहेत
1.सोशल डिस्टन्स 2.तोंडाला मास्क 3.स्वच्छता
4.सकस आहार 5.व्यायाम/योगा 6.नियमपालन
चला तर मग
'सारे मिळूनी ठरवूया, कोरोनाला हरवूया'
-सागर ननावरे, पुणे
www Facebook.com/sagarnanaware9
आज जगभरात कोरोना नामक विषाणूने हाहाकार माजविला आहे. जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही याचा फैलाव सध्या वेगात सुरु आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी आकडेवारी जनमानसात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे.
कामानिमित्त बाहेरगावी देशात परदेशात असणारी जनता हवालदिल झाली आहे. सक्तीची सुट्टी आणि त्यातही घराच्या बंदीखान्यात कैद असणाऱ्या जनतेला वेध लागले आहेत ते आपापल्या गावी जाण्याचे.
सध्या कोरोनाच्या संसर्गाचे शहरी-ग्रामीण असे विश्लेषण केल्यास निश्चितच शहरांतील परिस्थिती चिंताजनक आहे. बऱ्याच राज्यात ग्रामीण भागात अद्यापतरी दिलासादायक असे वातावरण आहे.
तसे पाहता ग्रामीण भारतातही कोरोनाने आता प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. मात्र शहरांइतकी भयावह परिस्थिती अजून तरी ग्रामीण भागात निर्माण झालेली नाही. आणि त्यामुळेच लोक आपला जीव धोक्यात घालून गावी जाण्यासाठी धडपड करीत आहेत. कोरोनापासून बचाव कसा करावा?
असे विचारल्यास आपण सहजपणे सोशल डिस्टन्स,वारंवार हात साबणाने धुणे, तोंडाला मास्क लावणे,वेळीच डॉक्टरांना दाखविणे आणि इतर स्टॅन्डर्ड प्रिकॉशन्स सांगू. परंतु आता त्यात अजून एक लोकमताचा मुद्दा समाविष्ट केला जात आहे आणि तो म्हणजे,'गावाकडे चला'.
'शहरांत आता काय ठेवलंय उलट परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे, त्यापेक्षा आपला गावाकडे जा, निदान सुरक्षित राहाल' असा सुर चर्चात सर्रास आळवला जात आहे.
आणि म्हणूनच त्यादृष्टीने लोक आपली पावले उचलत आहेत. कोणत्याही परिस्थितीत गाव गाठायचा हे या काळातील जणू अंतिम ध्येय बनू लागले आहे.
नुकताच लॉकडाऊनमध्ये राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य व्यक्तींसाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी परतण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. प्रशासनाकडे रीतसर अर्ज करून स्वगृही, गावी जाण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली. आणि काय आश्चर्य जिल्हा तसेच राज्यांतर्गत अर्ज करण्यासाठी वेबसाईट वर अक्षरशः झुंबड उडाली.
राज्यातील विविध मेट्रो सिटीतुन मोठया प्रमाणात अर्ज करण्यात आले. पुणे, नागपूर सारख्या शहरांत तर याचा उच्चंक पाहावयास मिळाला. पहिल्याच दिवशी पुण्यातून गावी जाण्यासाठी तब्बल साडेपाच हजार जणांनी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे नागपुरातून परराज्यात जाण्यासाठी किंवा परराज्यातून नागपुरात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ९ हजार ५०० नागरिकांचे अर्ज दाखल झाले.
वरील या आकडेवारी वरूनच सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत गावाकडे जाण्याची लोकांत किती ओढ आहे हे दिसून आले.
'गड्या आपला गावचं बरा', गावाकडे चला' अशी साद जनमानसात ऐकायला मिळाली.
आणि आज पुन्हा एकदा आठवण झाली ती स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी दिलेल्या 'खेड्याकडे चला' या देशव्यापी घोषणेची. आपला भारत देश हा पूर्वीपासूनच हा कृषीप्रधान देश राहिला आहे. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला खेड्याचा देश म्हणून ओळखले जायचे.
देशातील बहुसंख्य जनता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे.तसेच देशाची आर्थिक उन्नती कृषी ग्राम विकासावर अवलंबून आहे हे गांधीजीनी ओळखले होते. शेतीप्रधान ग्रामीण भारतातील उत्पादकता, गुंतवणूक, रोजगारनिर्मितीचे महत्त्व यावर 'खेड्याकडे चला' या घोषणेतुन गांधीजींनी लक्ष वेधले होते.
गाव स्वयंपूर्ण झाले तर देश विकसित होईल अशी त्यामागील त्यांची भावना होती.
आज मात्र गावाच्या स्वयंपूर्णतेसाठी नाही तर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाला गाव आठवत आहे.
इतर वेळी शहरांत असताना गावठी,अप्रगत आणि सोयीसुविधाचा अभाव असणारे गाव आज मात्र इस्पीतळापेक्षाही सुरक्षित आणि मंदिरापेक्षाही पवित्र वाटू लागले आहे.
तसे पाहता गेल्या काही वर्षांत ग्रामीण भारताचे शहरीकरण होण्याचा वेग आपण पाहतच आहे.
शेतीची कसदार जमीन घराखाली आली. सिमेंट ची जंगले फोफावत गेली.शेतात राबणारे हात शहरांकडे रोजीरोटी आणि सुखसुविधासाठी राबू लागले. आणि गावाचे गावपण ही हळूहळू कमी होत गेले. आणि अशा वेळी सातत्याने आठवण झाली ती गांधीनी दिलेल्या खेड्याकडे चला मंत्राची.
आजही हा मंत्र महानगरात घुमतो आहे. परंतु यावेळी कारण आणि परिस्थिती मात्र वेगळी आहे. कोरोनाच्या भीतीवर मात करण्यासाठी आता काळ्या आईची माया खुणवत आहे. स्वतःचा स्वार्थ पुन्हा एकदा मानवाला गावाकडे घेऊन चालला आहे. आणि लोंढेच्या लोंढे गावचा रस्ता पकडत आहेत. गावाच्या विसाव्यास जाण्यात नक्कीच काही गैर नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता पुण्या-मुंबईसारख्या अनेक शहरांहुन गावी जाताना गावाला सर्वस्व मानणाऱ्या गावकऱ्यांचा जीव तर आपण धोक्यात घालत नाही ना? याचाही विचार होणे गरजेचे आहे. आपल्या स्वार्थासाठी आपल्या काळ्या मातीशी एकनिष्ठ असणाऱ्या आपल्या गावाकडील बांधवाना असुरक्षित करणे योग्य नाही.
त्यामुळेच सध्या तरी शहरांत आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहणे सर्वांच्याच हिताचे आहे. आज शहरी भागात थैमान घालणारा कोरोना गावाच्या वेशीवर आल्यास त्याला आवरणे कठीण जाईल. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा या अतिशय कमी आहेत. त्यामुळे यातून उद्भवनाऱ्या परिस्थितीचा विचार ही करवत नाही. आज अमेरिका सारख्या देशांनी याच गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने तेथे कोरोनाचा कहर दिसत आहे. अमेरिकेच्या मोठ्या शहरांमध्ये पसरलेला विषाणू आता छोट्या भागात आणि खेड्यांमध्येही पोहोचला आहे.
लंडनच्या इंपेरियल कॉलेजमधील संशोधकांच्या भाकीतानुसार येत्या सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत जवळजवळ 22 लाख मृत्यू होऊ शकतात. हे भाकीत अमेरिका काय अवघ्या विश्वाला चिंतेत टाकणारे आहे. कारण जगातील अनेक राष्ट्रात वाढणारी आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे.
आजच्या घडीला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वागले पाहिजे. याची दाहकता आपल्या वर्तनावर अवलंबून आहे. जर आपण आहे तिथे सुरक्षित राहून स्वतःला आणि आपल्यांना वाचवू शकलो तर आपण अधिकाधिक लोक जिवंत राहू हे लक्षात घ्यायला हवे. खेड्याकडे जाण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहून कोरोनावर मात केली पाहिजे.
✍🏻 सागर ननावरे
Tuesday, 28 April 2020
#कोरोनावर लस #कोरोना उपाय #कोरोना उपचार #कोरोना बचाव
0
comments
कोरोनावर मात करायची आहे???तर मग वापरा....माईंड सॅनिटायझर
*कोरोनावर मात करायची आहे???*
तर मग वापरा....
*माईंड सॅनिटायझर*
सध्या जगभरात कोरोना नामक व्हायरसने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी निश्चितच चिंतेत वाढ करणारी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत आपण सर्वजण यावर मात करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत असतो. यातही या संकटावर कसा प्रतिबंध करता येईल यावर विशेष लक्ष देतो. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचेच घ्या ना. या महामारीत आपण सुरक्षित राहावे असे आपणा प्रत्येकास वाटते. आणि मग त्यासाठी आपण सर्व उपाय अवलंबिण्यावर भर देतो. मग त्यात आयुर्वेद, ऍलिओपॅथी, होमीओपॅथी, नेचूरोपॅथी असे सर्वच उपाय अवलंबिले जातात.
त्यातही सध्याच्या परिस्थितीत आपण विशेष लक्ष देतो ते मास्क आणि सॅनिटायझरवर. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी जगभर ही थेरपी वापरली जाते. आज घरोघरी हॅन्ड सॅनिटायझर वापरले जाते. आणि याच्या वापरातुन एक समाधान मिळत असते. आपला हात आपली त्वचा ही या सॅनिटायझरने निर्जतुक होण्यास मदत होते.
मात्र सध्याच्या परिस्थितीत कोरोनाशी सामना करताना माणूस मानसिकदृष्टयाही कमजोर होत चालला आहे. सतत कानावर पडणाऱ्या नकारात्मक बातम्या, चर्चा आणि घडामोडी मनावर परिणाम करीत आहेत. आणि याकडे मात्र आपण सरळसरळ कानाडोळा करीत आहोत. मानसिक दृष्टया खचलेला माणूस शारीरिकदृष्ट्या लवकर दुर्बल होत असतो.
अशावेळी आज हॅन्ड सॅनिटायझर सोबतच आपल्याला गरज आहे ती 'माईंड सॅनिटायझर"ची. ऐकायला थोडे विचित्र वाटते ना...
मात्र हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे.
माईंड सॅनिटायझर म्हणजेच मनातील विघातक आणि नकारात्मक संवेदनांचे निरर्जंतूकीकरण करणे. मनाला वेदना देणाऱ्या चिंतेत टाकणाऱ्या व्हायरसला डिलीट करणे.
सध्याच्या काळात घडणाऱ्या घडामोडी मानवी मनावर सखोल परिणाम करीत आहेत. परिणामी माणूस आधी मनाने आणि मग शरीरानेही दुर्बल होत चालला आहे. मनात येणाऱ्या नकारात्मक आणि चिंतादायी लहरी मनपटलावर आघात करीत आहेत. या काळात मानवाला हॅन्ड सॅनिटायझर प्रमाणेच माईंड सॅनिटायझर ची सुद्धा अत्यंत गरज आहे.
म्हणतात ना
*"मन चंगा तो कटोती मे गंगा"*
चला तर मग मनाला सशक्त करण्यासाठी माईंड सॅनिटायझर बद्दल समजून घेऊया...
या माईंड सॅनिटायझरचा मुख्य कंटेन्ट आहे तो म्हणजे "सकारात्मकता" आजच्या या कसोटीच्या काळात भयभीत करणाऱ्या नकारात्मक गोष्टींनी अवघे विश्व् व्यापले आहे.याचा परिणाम हा आपल्या मनाला नकारात्मकतेच्या भयावह खाईत लोटत आहे. त्याच त्या वेदनादायी बातम्या, रोजच रंगणाऱ्या कोरोनाग्रस्ताच्या चर्चा याने मन विषन्न होते. लॉकडाऊनच्या काळात पर्यावरणाचे प्रदूषण दिवसेंदिवस घटत असले तरी मानवी मनातील चिंतेचे आणि भीतीचे प्रदूषण मात्र वाढतच चालले आहे. अशावेळी गरज आहे ती सकारात्मक विचार करण्याची. 'जातील हेही दिवस निघून' असा मनाला दिलासा देण्याची. डोळ्यासमोर आशादायी चित्र सतत आणण्याची.
एका जागतिक सर्वेक्षणानुसार विविध साथीत, आजारांत लोक हे साथीच्या संसर्गापेक्षा भीतीच्या संसर्गानेच जास्त दगावतात. नकारात्मक मानसिकता ही विविध शारीरिक व मानसिक व्याधीना आमंत्रण देत असते.
एक मानसशास्त्रीय कथा आपल्याला माहित असेलच....
परदेशात एका कुप्रसिद्ध कैदयाला फाशीची शिक्षा सुनावली गेली. तेव्हा तेथील काही वैज्ञानिकांनी विचार केला, की आपण या कैद्यावर काही प्रयोग करूयात. तेव्हा त्या कैद्याला सांगितलं गेलं, की तुला फाशी न देता विषारी कोब्रा डसवून मारू.
त्यांनतर त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेला. त्या कैद्यांला चांगलाच घाम फुटला. आता त्या कैद्याचे डोळे बंद करून त्यास खुर्चीला बांधले. आणि त्याला साप डसवून नाही, तर दोन टाचण्या टोचण्यात आल्या. आणि काय आश्चर्य त्या कैद्याचा काही सेकंदातच मृत्यू झाला.
पोस्टमॉर्टेम केल्यानंतर समजलं, की कैद्याच्या शरीरात सापाच्या 'व्हेनम'सदृश्य विष आहे.
आता हे विष कुठून आलं,की ज्यामुळे कैद्याचा जीव गेला?
ते विष मानसिक धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच उत्पन्न केलं होतं!
आपल्या प्रत्येक संकल्पामुळे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी उत्पन्न होते व त्यानुसार आपल्या शरीरात हार्मोन्स उत्पन्न होतात.
त्यानंतर च्या एका निष्कर्षात असे अढळले की, 90% आजारांचं मूळ कारण नकारात्मक विचारांनी उत्पन्न होणारी ऊर्जाच आहे.
म्हणूनच सध्याच्या या काळात जरी कोरोनाने थैमान घातले असले तरी अशा परिस्थितीत आपल्या मनाला सशक्त करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही की लॉकडाऊन चे नियम मोडून आचरण करणे.
मनात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण करायला हवी. मनात भीती किंवा चिंता यांचा संचार सुरु झाला की अनेक दुर्घटना घडताना दिसतात. सध्या कोरोनाच्या भीतीने कुठे गावाकडे जाताना अपघातात जीवितहानी होत आहे, कुठे तुरुंगात कैदी एकमेकांना मारहाण करीत आहेत, कुठे खोकला म्हणून मारहाण करून जीव घेतला जात आहे, अफ़वावर विश्वास ठेऊन सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे, कुठे लोकांना वाळीत टाकून त्यांच्या जीवाशी खेळ चालला आहे अशा अनेक दुर्घटना या मानसिक नकारात्मक भावनेमुळेच घडत आहेत. म्हणूनच आता सुज्ञ व्हायला हवे. सदसदविवेकबुद्धीने वागून आपली भूमिका धैर्याने बजवायला हवी.
अशा वेळी खरं तर जबाबदारीने वागून खबरदारी बाळगून या संकटाशी दोन हात करायला हवेत. उद्याच्या कोरोनामुक्त जगाचे आशादायी सामाजिक चित्र मनमंदिरात निर्माण करायला हवे. आपल्या बोलण्या-चालण्यात-वागण्यात कमालीची सकारात्मकता यायला हवी.
आता या माईंड सॅनिटायझरसाठी आपल्याला खालील काही गोष्टी नक्कीच आचरणात आणायला हव्यात.
1. बातम्या या केवळ सद्यस्थितीचे ज्ञान आणि आवश्यक त्या खबरदारी साठीच पाहाव्यात/वाचाव्यात.
2. चर्चा ही सकारात्मक हवी उगाच आपल्या चर्चेतुन समाजात भीतीदायक चित्र निर्माण करू नये.
3. या काळात आपली रोगप्रतिकारकता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.यासाठी सकस आहार, दैनंदिन चांगल्या सवयी, व्यायाम, प्राणायाम, योगासने, मेडिटेशन यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा.
4.या काळात नियम आणि संयम याचे अवश्य पालन व्हायला हवे. लक्षात ठेवा 'जिथे सुटला संयम आणि तुटला नियम तिथे समोर उभा 'यम'.
5. याकाळात तडजोड आणि प्राप्त परिस्थितीला स्वीकारून त्याप्रमाणे जीवन जगायला हवे.
बाकी कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक शारीरिक कृती आपण पाळतच असाल अशी खात्री आहे.
आता मनाकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
*मन करारे प्रसन्न*
*सर्व सिद्धीचे कारण*
चला तर मग आता माईंड सॅनिटायझरने या मनाला सशक्त आणि सकारात्मक करूया....
*मिटवू कोरोनाचा ज्वर*
*वापरू माईंड सॅनिटायझर*
✍🏻©️ *लेखक: सागर न. ननावरे*
sagarfinancial5@gmail.com
📞 9657991677
www.sagarnanaware.blogspot.com
Tuesday, 24 March 2020
#गुढीपाडव्याच्या शुभेच्छा #gudhipadava
0
comments
कोरोना मुक्त गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
*दृढ निश्चयाची उंच गुढी,*
*कदापि मागे सरणार नाही.*
*आता पुरून उरु कोरोनाला,*
*पुन्हा कुणी मरणार नाही.*
*काळजी घेऊ घरी राहून*
*ही मनोमनीची इच्छा,*
*सुदृढ आयुष्य लाभो सर्वांना,*
*या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा*
©✍🏻 *सागर ननावरे*
Friday, 20 March 2020
#कोरोना #corona #gocorona #करोना #कोरोनाखबरदारी
0
comments
✅ *कुछ करो और कुछ _"करो-ना"_* ❌
✅ *कुछ करो और कुछ _"करो-ना"_* ❌
sagarnanaware.blogspot.com
सध्या जगभरात कोरोना नामक व्हायरसने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यावर अद्यापतरी कोणताही उपचार उपलब्ध नाही मात्र योग्य उपाययोजना/खबरदारी मात्र निश्चितच यावर मात करण्यास मदत करेल. यासाठी एवढेच करा
✅ *कुछ करो* (सवयी)✅
👏🏻 *दर तासाला हात साबणाने स्वच्छ धुवा*
🤦🏻♂️ *खोकताना शिंकताना तोंडासमोर हात/रुमाल धरा*
😷 *बाहेर पडताना तोंडाला मास्क/रुमाल बांधा*
🚨 *प्रशासनाच्या नियमांचे पालन करा*
💪🏻 *नियमित व्यायाम व सकस आहाराने रोगप्रतिकारकता वाढवा*
❌ *कुछ _"करो-ना"_ (खबरदारी)* ❌
🤤 *उघड्यावर थुंकु नका*
👩🏻⚕️ *लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका,(डॉक्टरांना भेटा)*
🚶🏻 *सध्यातरी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा*
👩👩👦👦 *जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, प्रवास टाळा*
🤬 *अफवा पसरवू नका तसेच घाबरू नका*
चला
*काळजी घेऊया एकसाथ*
*कोरोनावर करूया मात*
*© सागर ननावरे*
sagarnanaware.blogspot.com
Subscribe to:
Posts (Atom)