Wednesday, 30 December 2015 0 comments

नव्या वर्षात जाताना...

२०१५ माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय वर्ष...

खूप काही दिलं या नवीन वर्षाने   नवीन मित्र,नाती अनुभव,यश-अपयश आणि जिद्दीने जगण्याची प्रेरणाही.

गतवर्षात अपेक्षेइतका पैसा नाही कमावता आला कदाचित पण तुमच्यासारखी जी जिवलग व गोड माणसे मिळाली हि करोडो रुपयांना ही लाजवणारी होती.

गतवर्षात माझ्या सुख- दुखात,आनंदात आपला प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे  सहभाग हा नक्कीच सुखावणारा होता. त्याचप्रमणे गतवर्षात मिळालेल्या माझ्या लेखनरुपी  यशाला आपल्या कौतुकाची जी सोनेरी किनार मिळाली हीच माझी प्रेरणा ठरली.

आपले सर्वांचे प्रेम,आधार आणि प्रेरणा येत्या नवीन वर्षातही अशीच राहो तसेच आपली नाती वर्षानुवर्षे अशीच दृढ होत जावो हीच गणेशाचरणी प्रार्थना.

तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे नवीन वर्षासाठी व येणाऱ्या नवीन यशासाठी खूप खूप शुभेच्छा 

आपलाच 

सागर नवनाथ ननावरे  

0 comments

                                                    मावळतीच्या सूर्याप्रमाणे
                                                       सरले आणखी एक वर्ष
                                                         सज्ज झाल्या दाही दिशा
                                                              करण्या नववर्षाला स्पर्श 
Tuesday, 29 December 2015 0 comments
                                                           साहित्यातील ध्रुवतारा निखळला


                                              "या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे"
या ओळींनी अखंड मानवजातीला जगण्याचा खरा अर्थ मिळवून दिला पण आज कविवर्य मंगेशकरांच्या जाण्याने या ओळीही पोरक्या झाल्या. कधी निमुटपणे अन्याय सहन करणाऱ्या समाजाच्या षंढ पानावर आपल्या काव्यातून ताशेरे ओढणारे पाडगावकर तर कधी जगण्यातला दुर्दम्य आशावाद जागविणारे कवी पाडगावकर खरं तर तमाम रसिकप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पाडगावकर हे एकमेवाद्वितीयच!
                                              निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही ! 
                                                आपल दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही !!
असं म्हणून स्वाभिमानी आणि स्वावलंबीपणा त्यांनी प्रत्येकाच्या नसानसात भरला. ' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच नि आमचं सेम असतं',अशा  शब्दांत सर्वांना प्रेम करण्यास शिकवणा-या पाडगावकरांच्या प्रेमात संपूर्ण महाराष्ट्र पडला होता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर आपल्या कविता मनमुराद उधळणारा आणि आपल्या कवितांतून सर्वांचं जीवन समृध्द करणारा  पाडगावकरांसारखा दुसरा कवी मराठीत नाही..
मराठीला आपल्या कवितांनी चिरतरूण करणाऱ्या कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. कण्हत कण्हत जगण्यापेक्षा गाणे म्हणत जगायला शिकविणारे पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण  पाडगावकर जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या कविता मात्र अजरामर राहतील.
कविवर्य पाडगावकरांना विनम्र श्रद्धांजली.

- सागर नवनाथ ननावरे
Ref by:sagarnanaware.blogspot.in
Friday, 11 December 2015 0 comments
                    " स्मार्टफोन वरचा 'सेल्फि'शपणा "
                                                 -सागर नवनाथ ननावरे (12/12/15)

असं म्हणतात टेक्नॉलॉजीमुळे जग जवळ आलंय,जगाचे माहित नाही पण स्मार्टफोन मात्र सर्वांच्या जवळ आले आहेत. स्मार्टफोन ही प्रत्येकाची त्यातल्या त्यात तरुणाईची  मुलभूत गरज होऊन बसली आहे. पूर्वी स्वतःसाठी,कुटुंबासाठी झटणारे आता " फोन के लिये साला कुछ भी करेगा' अशा अविर्भावात वागत आहेत. सध्याच्या युगात कामाचा व्याप व वेग पाहता आपण नवनवीन  टेक्नॉलॉजी व बदल  नाकारु शकत नाही ! स्मार्ट फोनचा योग्य वापर योग्य वेळी करुन आपण ई-मेल,सोशल मिडीया,गुगल सर्च व स्मार्ट फोनचा उपयोग कॉम्प्युटर किंवा कामात मदतनीस म्हणुन केल्यास ते एक अत्याधुनिक वरदानच म्हणता येईल.
दुर्दैव इतकंच स्मार्टफोन जवळ येऊनही माणूस अजूनही 'स्मार्ट'' झालेला नाही, कारण कोनती गोष्ट कशासाठी,कितीवेळ आणि कशाप्रकारे वापरावी हे अजून कुणाला समजलेच नाही.
काही दिवसांपूर्वीच व्होट्सअपवर  वाचनात आलं आणि मन अस्वस्थ झालं ,रेल्वेप्रवासात दाराला लटकून प्रवास करताना एकाला आपला जीव गमवावा लागला. पण यापेक्षाही पुढची हद्द म्हणजे त्याला हात देण्याऐवजी,आधार देण्याऐवजी आजची 'सेल्फी'श' तरुणाई त्याच्या जीवासाठी चालणाऱ्या धडपडीचे मोबाईल वर शुटींग करत होती. हीच का ती टेक्नॉलॉजी माणसाच्या जीवावर बेतणारी, माणसाला माणुसकीपासून दूर नेणारी?
आजकाल अशा बर्याच घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि त्या याच टेक्नॉलॉजीमुळे आपणापर्यंत पोहोचतातही पण प्रश्न एवढाच पडतो कि एखाद्याच्या मदतीसाठी धावण्याऐवजी त्याच्या मोबाईल शुटींगसाठी लोकं एवढे का धावतात?
हीच वेळ जर आपल्या कोणावर आली आणि त्यावेळीही असाच अनुभव आल्यावरच आपण शहाणे होणार का?
ज्या शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी,गोरगरिबांच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली आणि स्वराज्याची स्थापना केली त्या शिवबाच्या भूमीतील त्याचे वारसदार हाती स्मार्टफोन घेऊन विकृतीला आळा घालण्याऐवजी त्याचे चित्रण करतात हाच का आपला वारसा?
आपल्या आया बहिणींवर हात टाकणाऱ्यांचे हात छाटण्याची शिकवण ज्या शिवबाने दिली त्याच्याच भूमीत स्त्रियांवर अत्याचार करून तेच हात स्मार्टफोनने अश्लील चित्रण करतात हीच का आमची संस्कृती?
आजकाल प्रत्येकजण आपल्या सेल्फी'त इतका गुंतलाय कि त्या वरवरच्या सुंदर दिसणाऱ्या सेल्फिने आपलं अंतर्मन मात्र पूर्ण पोखरून टाकलंय. माणुसकी,आपुलकी,परोपकार आणि प्रेमाची जागा आज स्मार्टफोनच्या 'सेल्फि'शपणाने केव्हाच आपल्या मेमरीतून डिलीट केलीय. लोकांच्या हृदयात राहण्याऐवजी मोबाईलवर ऑनलाईन राहण्यातच जो तो मश्गुल आहे.
आपल्या शरीरावर प्रेम करणारी,व्यायाम करून शरीराच्या अब्स साठी धडपडणारी तरुणाई आज मोबाईल मधल्या अप्स साठी धडपडतेय कसे राहणार हे फिट. मैदानी खेळांनी चपळ आणि सशक्त असणारी तरुणाई आज तरुणाई चष्मा लागेपर्यंत आणि डोक्याचे सपाट मैदान होईपर्यंत स्मार्टफोन वर गेम्स खेळतात हेच का आमच्या  देशाचे भवितव्य?
व्होट्स अप वर डीपी ठेऊन थोरांना मानवंदना देण्यात कसला आलाय देशाभिमान?
निषेद किंवा समर्थनाच्या पोस्ट शेअर करून स्वतःच्या पुचकट योगदानाची साक्ष देण्यात कसली आलीय मर्दुमकी?
आणि फोटो एडीट करून चमकवून  फेसबुक वर टाकून स्वतःच्या दोषांवर पांघरून घालण्यात कसले शहाणपण?

मित्रांनो बदल आणि टेक्नॉलजी नक्कीच मानवाच्या जीवनात बदल घडवू शकते पण हीच टेक्नॉलजी आपल्याला चुकीच्या सवयीचे गुलाम सुद्धा बनवू शकते.
अजूनही वेळ गेली नाही आपल्या आयुष्यात आपल्याला शेवटपर्यंत साथ देणाऱ्या माणसांना स्मार्टफोनच्या 'सेल्फि'शपणामुळे दुरावण्यात काहीही अर्थ नाही. कारण आयुष्य खूप सुंदर असलं तरी ते एकदाच मिळतं हे विसरून चालणार नाही. त्यामुळे या एकदाच मिळालेल्या सुंदर आयुष्यात वेळ,पैसा आणि बुद्धी स्मार्टफोनच्या अतिव्यस्त मायाजाळात वाया घालवून हाती काहीही लागणार नाही. शेवटी कुठे थांबायचे आणि काय करायचे ते आपण आपलेच ठरवायचे आहे.


लेखन आणि संकल्पना: सागर नवनाथ ननावरे
पत्ता: बालाजीनगर,धनकवडी,पुणे

Blog: sagarnanaware.blogspot.in






Thursday, 10 December 2015 0 comments
‘मनाचा कॅमेरा’
लग्नानंतर हनिमून साठी कुठे जायचे यावर विचारमंथन चालू असताना मनात अनेक पर्यटन स्थळांची नावे येउन गेली पण शिक्कामोर्तब ाही होईनाअखेरीसजीवाचा "गोवा "करायचे ठरविले आणि गोव्याला जाण्यासाठी निघालोपुण्यावरून रात्री बसलो असता सकाळी गोव्यात ोहोचलोभूरळ घालणारे समुद्रकिनारे निसर्गरम्य ठिकाणी सामूहि सहल करण्यापेक्षा स्वतः जोडीने वेगवेगळी ठिकाणे गाडीने जाऊन फिरण्याची मजा काही औरच होतीकलंगुट वर मनसोक्त पाण्यातभिजल्यानंतर जवळच - किमी अंतरावर सणाऱ्या प्रसिध्द बागा बीच पाहण्यासाठी बीचच्या किनाऱ्यावरून जाताना पायाला मखमली स्पर्श देणारी वाळू मनालाआनंद देत होतीसमुद्राच्या उंच दुधाळ लाटा,किनाऱ्यावरची नारळीची झाडेभणाणणारा खारा वारा आणि या निसर्गसागराचा आनंद लुटणारे देशी
 विदेशी पर्यटक अशीनयनरम्य दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत चाललो होतोया साऱ्या आठवणी टिपणारा आमचा कॅमेरा म्हणजे जणू ाही सच्चा सवंगडीच वाटत होता.
बागा बीच थोड्याच अंतरावर आलेला असतानाच जोरदार पावसाने त्या ौंदर्यावर एक मनमोहक साज चढवला. आम्ही दोघे पूर्ण पावसात भिजलो होतो दोघांचेमोबाईल प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होतेअचानक फोन वाजू लागला म्हणून मी मोबाईल बाहेर काढून पहिला तर वडिलांचा मिस कॉल दिसला परंतु गोव्याच्या यासौंदर्याचा आस्वाद घेण्यात मग्न असल्याने नंतर कॉल करत येईल म्हणून  मी दुर्लक्ष केले  फोन तसाच खिशात ठेवलावरू कोसळणारा जोराचा पाऊस आणिपोटापर्यंत येणाऱ्या समुद्राच्या लाटा या आनंदात पूर्ण न्हावून निघालो होतोतासभर आनंदाचा आस्वा घेतल्यानंतर अंधाराची चाहूल ागताच आम्ही बाहेर पडलोआणि रूमकडे जाण्यासाठी निघालोपाऊस ांबलेला होता म्हणून घरी फोन करण्यासाठी मोबाईल काढला दोघांचे मोबाईल बंद होते.
कदाचित भिजल्यामुळे बंद पडले असतील म्हणून रूम वे गेल्यावर सीमकार्ड  काढून पंख्याखाली वळायला ठेवून पहिला पण काही केल्या फोन चालू होत नव्हते.त्यानंतर मोबाईल स्टोअर मध्ये दाखवले परंतु ते डेड झाले असल्याचे कळाले आणि सर आनंदच क्षणात निवळला.  
 सकाळी पोहचल्यानंतर परत कॉल का नाही आला या काळजीपोटी घरचे काळजीत असणार याची चिंता सतावत होतीआता कॅमेऱ्यात टिपलेले अविस्मरणीय क्षणपरत कसे पाहता येणापहिल्याच दिवशी अशी अवस्था ाल्याने पुढील दिवसांची क्षणचित्रे कशी काढता येणार ? आणि आता संपूर्ण टूर एकदम निरस होणार या विचारांनी मन कासावीस झाले. पाहता पाहता ते २/३ दिवस अगदी धमाल मौज मजेत निघूनही गेले. पुण्याला येताना गाडीत एकूणच टूर बाबत मनात विचार येऊ लागले. आणि या गोव्याच्या भेटीत काय गमावले  आणि काय कमावले याची वेगवान चक्रे मनात फिरू लागली. मोबाईल आणि त्या क्षणांच्या आठवणींना या टूर मध्ये मुकलो होतो पण मोबाईल मुक्त टूर चा आनंद विनाव्यत्यय घेतला होता.
कॅमेऱ्यात फोटो टिपण्याच्या नादात तो निसर्ग मनामध्ये साठवायला विसरलो नव्हतोनिसर्गाचे  चित्तवेधक आणि अद्भुत रूप मनाच्या कॅमेऱ्यात भरभरून साठवलेहोतेना कॉल ना मेसेज ना व्होट्स अप फक्त आणि फक्त भटकंतीचा आनं .
बऱ्याचदा आपण  कॅमेऱ्यात क्षण  टिपण्याचा प्रयत्न करतो आणि एखाद्या सुंदर कलाकृतीचा,स्थळाचा थवा अविस्मरणीय क्षणाला आपल्या मनात साठवायलाविसरतोएकूणच या गोवा ट्रीपने  मला हे चांगलं कळलं कि कॅमेऱ्याने आपण  ते सारे क्षण फोटो पाहून आठवू शकतो पण पल्या मनाच्या कॅमेऱ्यात मात्र ते साठवूशकत नाहीपाहिले दोन िवस मोबाईलविना घालवताना नशीबच फुटकं सारखे  ‘फुटकळ’ विचार मना आले पण नंतर मात्र एका उक्तीचा चांगलाच साक्षात्कार झालाआणि तो म्हणजे " जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं".
Friday, 4 December 2015 0 comments

Awarded by



0 comments

dostanchi duniyadari in Maharashtra Times


 
;