Tuesday, 16 September 2014
माझ्यामते निवडणुका तोंडावर आल्यावर विकासकामे केवळ जाहिरनाम्यापुरती मर्यादित न राहता येणाऱ्या ५ वर्षांत त्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे . येत्या निवडणुकीसाठी विकासाच्या दृष्टीने खालील मुद्द्यांचा विचार व्हावा हीच लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा
१)कचऱ्याच्या साठा पद्धतीला पायबंद घालून आधुनिक कचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करावेत
२)महिलांवर होणाऱ्या हर तऱ्हेच्या अत्याचार व हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी महिला अत्याचार निर्मुलन केंद्रांची स्थापना करण्यात यावी. यामार्फत तक्रारींची नोंद पोलिसांत व राज्य महिला आयोग यांच्याकडे पाठपुराव्यासाठी दिली जावी.
३) पुण्याला एक आधुनिक शहर व सांस्कृतिक पर्यटनस्थळ बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असावे.
४) खड्ड्यांसाठी प्रसिध्द असलेल्या पुण्याचे नाव स्व्च्छ आणि सुंदर रस्त्यांच्या नावाने कसे ओळखले जाईल यासाठी पाठपुरावा व्हावा.


-सागर नवनाथ ननावरे

0 comments:

Post a Comment

 
;