मुलांना कोषमुक्त जीवन जगू द् या...
'अवघे विश्वची माझे घर 'असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे . प ण आज आपल्या मुलांपलीकडे दुसरे जगच नाही असे समजणाऱ्या पालका ंकडे पहिले की वाईट वाटते.आपला परिवार म्हणजेच आपलं जग आणि घरा तील माणसे म्हणजेच अवघा समाज अश ी शिकवण नकळतच मुलांवर बिंबवली जात आहे.
शाळेवर छात्रशिक्षक म्हणून काम करताना एकदा ७ दिवसांसाठी एका श िबिरासाठी आम्ही निघालो होतो. प हाटे सर्व शिक्षकवृंद व विद्या र्थी आणि त्यांना निरोपदेण्यासा ठी आलेले पालक असा एक घोळका जमल ा होता. कोणी आई आपल्या मुलाचे वारंवार पापे घेत होती तर कोणी रडत होती, नीट रहा ,जेवण करा, क ाळजी घ्याअसे शब्द सतत कानावर प डत होते. काही पालक तर ‘मुलांशी फोनवर बोलू द्या’म्हणून आयोजका ंपाशी हट्ट धरत होते.
अशी हि सारी परिस्थिती पाहिल् यावर मनात विचार आले कशी घडणार हि मुले आणि कधी जगणार कोषाबाहे रचं जीवन. त्यांना बाहेरच जग अन ुभवता यावं, त्यांच्याज्ञानात भ र पडावी,त्यांना शेअरिंग म्हणजे काय हे कळावं आणि अनुभवसमृद्धी त वाढ व्हावी हा या विविध शिबि रांमागचा उद्देश असतो. बाहेरच् या गर्दीत मुलाचे संस्कारहरवू न येत म्हणून आपण त्यांना जर हाताला धरून ठेवले तर कशी कळणार त्यांना सामाजिकता आणि कधी येणार परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता.
मुलांबाबत प्रेम असण ,काळजी वा टण साहजिक आहे पण असे त्यांना आ पल्या विश्वात डांबून आपण अतिरे काने त्याचं बालपण तर हिरावून घ ेत नाही ना? याचाप्रत्येक पालका ने विचार करणे गरजेचे आहे.या अश ा वागण्याने आजकालच्या मुलांना उन्हाळ्याची सुट्टी आणि मामाचे गाव अशा संकल्पनांचा विसर पडत च ाललाआहे.या घरकोंबडी वृत्तीमुळे मुलांच्या सूरपारंब्या ,कब्बडी ,खो खो,आट्यापाट्या,आणि विविध श ारीरिक हालचालींची जागा आज मो बईल आणि कॉम्पुटर गेम्सनेघेतली आहे. पोहणे,धडपडत सायकल शिकणे,ध ावण्याची स्पर्धा,गच्चीवरचा पत् त्यांचा डाव,आणि रात्री बिछाने पसरून चांदण्यांनी भरलेल्या आका शाकडे पाहत झोपीजाणे या बालपणी च्या सुखाला आजची पिढी पारखी झा ली आहे.
पैशाच्या स्पर्धेत धावताना आपण आपल्या मुलांच्या संगोपनावर कि ती दुर्लक्ष करतो याची जाणीव आप ल्याला व्हायला हवी,यासाठी पा लकांनी पुढाकार घ्यायला हवा.मु लांच्या निकोप वाढीसाठी पालकां नी त्यांच्यावर लादलेली जीवनपद् धती आणि घातलेले सुरक्षाकवच त् यांना मारक ठरणार नाही याची पा लकांनी काळजी घ्यायलाहवी.
मुलांच्या बाह्य व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध शिबिरांबरो बरच आंतरिक विकास आणि व्यक्ती ‘ घडवण्यावर भर देणारे कार्यक्रम ,चित्रपट, नाट्य,आणि विविधप्रो ग्रॅमसाठी पालकांनी स्वतःमुलां सोबत हजेरी लावली पाहिजे. जाणी वपूर्वक बाहेरच्या कार्यक्रमां ना एकटे पाठवून बाह्य जगाचा परि चय त्यांना करायला दिला पाहिजे. यातूनच मुलांची वेगवेगळ्या विचा रप्रवाहांशी ओळख होऊन त्यांचे व ्यक्तिमत्त्व परिपक्व व्हायला म दत होईल.
आज संपर्काची इतकी साधनं उपलब्ध असताना कोणतीही भीती पालकांनी बाळगू नये उलट यामुळे मुलं स् मार्ट होतात हे लक्षात घ्यावं. स्मार्टनेस म्हणजे फक्त ब्रँडेड वस्तू,कपडे किंव इंग्रजी बोलणे नाही. स्मार्टनेस म्हणजे आत्मवि श्वास, निर्णयक्षमता, व्यवहारी कता. मुळात मुलांना चुका करण्या ची संधीच आपण दिली तरचं त्यां चेनिर्णयकौशल्य वाढेल. या सर् वातून मुलं इतकी तावून सुलाखून निघतील की उद्या मोठं झाल्यावर, जगताना, व्यवसाय करताना ज्या अ डचणी आणि आव्हानं समोरयेतील त् याला तोंड देण्यासाठी मुलं सदैव तयार असतील .”
थोडक्यात पालकांनी मुलांवर लक् ष जरूर ठेवावं मात्र आयुष्याच् या रणांगणात कधीतरी मोकळ सोडावं .
या संदर्भात पालकांसाठी खालील ओ ळी आवर्जून सुचवाव्याशा वाटतात ,
'मुलांसाठी असू द्या मायेची उब
अन भावभावना ंचा पसारा
पण उद्याच्या भविष्यासाठी
- सागर नवनाथ ननावरे, पुणे.
Mob: 9657991677
E-mail: sagarfinancial5@gmail. com
Blog: sagarnanaware.blogspot. in
0 comments:
Post a Comment