Saturday, 14 May 2016

वेळेचे नियोजन


वेळेचे नियोजन

वेळ मानवाच्या जीवनाला गती देणारा एकअविभाज्य घटक,वेळ प्रत्येकाच्या आयुष्यातीलसर्वाधिक महत्वाची गोष्ट . आजच्यास्पर्धेच्या युगात तर याला विशेष महत्त्व आहे.वेळ हि एक अशी गोष्ट आहे  जी पैशानेखरेदी करता येत नाही आणि ती गेली कीकाही केल्या पुन्हा आणता येत नाही. वेळेमुळेअनेक गोष्टी घडतातही आणि बिघडतातही.टाईम इज मनी, काळ आला होता पण वेळआली नव्हती, अशा अनेक म्हणी विशेषप्रसिद्धही आहेत. हीच ती वेळ असे म्हणूनएखाद्या कामाचा प्रारंभही केला जातो, किंवागेली ती वेळ म्हणून पश्‍चात्तापही केला जातो.कधी कधी वेळ मारून नेली जाते, तरएखाद्यावर एखादी वेळ येऊही शकते.

वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतोकारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्हीपुन्हा स्पर्श करू शकत नाही.कारण नदीच्याप्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येतनाही.

असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळपुन्हा परत येत नाही. कारण वेळ हीकोणासाठी थांबत नसते. एकदा निघून गेलेलीवेळ पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणूनआपण आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करूनआपली प्रगती वेगाने करायला हवी. आजकालजमाना बदलतोय काळ घड्याळाच्याकाट्यामागे   धावतोय आणि या धावत्याजीवनशैलीत ज्याने वेळेवर विजय मिळवलातोच आयुष्यात यशस्वी झाला असे म्हणावेलागेल. एका कवीने वेळेबाबत अतिशयसमर्पक शब्दांत वर्णन केले आहे,

'फिरत्याला गती द्या,

काळ मागे चालला,

थांबला तो संपला'.

याचाच अर्थ असा कि

याचाच अर्थ असा कि आयुष्यात प्रत्येक गोष्टकरताना वेळेचा प्राधान्याने विचार करायलाचहवा, आपल्यासाठी आपले सगेसोयरेथांबतील, मित्र थांबतील परंतु गेलेली वेळपुन्हा कधीच येत नाही अगदीकृष्ण्चरीत्रातल्या आकाशवाणी सारखी.आयुष्याच्या व्यवस्थापनात वेळेच्यानियोजनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.

वेळेच्या नियोजनाबद्दल मी ऐकलेली एक सुंदरग्रीक कथा आपल्याशी नक्कीच शेअर करायलाआवडेल, 

एकदा एक शिष्य आपल्या गुरूंकडे गेला आणिगुरूंना आपले गार्हाणे सांगू लागला कि,”मीकामात आणि सर्व गोष्टींत स्वतःला इतकाव्यस्त ठेवतो तरी मला अनेक गोष्टीकरण्यासाठी वेळ पुरत नाही आणि त्यामुळेबर्याच गोष्टींना मुकावे लागते, तर मग मलासांगा मी काय करू?     गुरुंनी त्याच्याकडेपहिले आणि स्मितहास्य केले.

आणि एक मोठा जार त्याच्या हातात दिलाआणि त्याला त्यात मुठीएवढे ओबडधोबड दगड भरायला सांगितले शिष्याने त्यात दगडभरले.

गुरूने विचारले "आता तो जार भरला "?

शिष्य म्हणाला," हो भरला!

गुरूंनी त्याला मुठभर माती दिली आणि तीत्यात टाकून ते हलवायला सांगितले

गुरूने पुन्हा विचारले  "आता तरी  तो जारभरला का  "?

शिष्य म्हणाला," हो भरला, अगदी काठोकाठ!

गुरूंनी त्याला ग्लास भरून पाणी दिले आणिते त्यात ओतण्यास सांगितले. शिष्याने पाणीत्या जर मध्ये ओतले,

गुरूने पुन्हा विचारले  "आता तो जार भरलाका  "?

शिष्य म्हणाला," हो भरला,अगदी घट्ट,ज्यातून आता तो जार उलटा केला तरीत्यातून काहीही सांडणार नाही  !

गुरूंनी आपल्या शिष्याला सांगण्यास सुरुवातकेली

आपलं जीवन हे त्या जार सारखे असते ज्यातआपण ते  दगड, माती  आणि त्यापाण्यासारख्या वेगवेगळ्या रंगांनी ते जीवनफुलवण्याचे,रंगविण्याचे काम करीत असतो.परंतु हे रंग भरताना आपण कोणत्यावेळी,कोणत्या क्रमाने, किती आणि कोणते रंगभरायचे हे आपणास माहित नसते. त्यामुळेचआपण नेहमी आपल्या मनाचा ग्रह करून  याना त्या गोष्टींविषयी तक्रार करीत असतो.तुझंही अगदी तसाच झालंय तुझ्याआयुष्याच्या जार मध्ये कोणत्या गोष्टींनाकिती वेळ द्यायचा हे तुला कळत नाही.परिणामी बराचसा वेळ तुझ्याकडे असूनहीकेवळ वेळेचे नियोजन नसल्याने तू वेळेबाबततक्रार करत बसला आहेस.

शिष्याला आपली चूक लक्षात आली आयुष्यजगताना काम,कुटुंब,नाती,पैसा,छंद आणिइतर अनेक गोष्टींना पुरेसा वेळ देऊन आपणमनमुराद आनंद घेऊ शकतो याचा चांगलाचधडा त्याला मिळाला.

आयुष्यातल्या प्रत्येक कामासाठी वेळेचेनियोजन करणे गरजेचे असते.

मित्रांनो आपल्यालाही या सुंदर आयुष्यातअनेक गोष्टी करायच्या असतात परंतु वेळेच्याअभावाचे कारण पुढे ढकलून आयुष्यातीलविविध अविस्मरणीय पैलूंना आपण मुकत असतो. चल तर मग आपल्या आयुष्यालावेळेच्या नियोजनाची किनार देऊन एकदाचमिळालेल्या बहुमोल आयुष्याच्या प्रत्येकक्षणाचा आनंद घेऊया

0 comments:

Post a Comment

 
;